Thursday, April 9, 2015

पुन:श्च हरिओम!

गेले काही वर्षे/ महिने इथे काहीच लिहिलं गेलं नाही माझ्याकडून!
काही लिहिण्याची इच्छाच होत नव्हती….
आता पुन्हा लिहायला सुरुवात करतोय…
पण आता या लिखाणाचं स्वरूप केवळ ललित नसेल.  जर काही नवीन ललित लिहावसं वाटलं तर ते लिहिनही…
पण यापुढच्या लेखनाचं स्वरूप हे मुख्यत: कोमेंटरीच्या स्वरूपातलं असेल.
आजही मी चार मराठी वर्तमानापत्रे वाचतो, आणि दोन मराठी संकेतस्थळांचा सभासद आहे.
तेंव्हा आपल्या मराठी माणसाच्या जीवनात ज्या काही समस्या/विसंगती आहेत त्यावर लिहिण्याचा हा एका प्रयत्न आहे आहे…
कुणाला विनोदी वाटेल, कारण तोच माझा प्रयत्न आहे; पण कुणाला अकारण खरचटल्यासारखं वाटेलही.
पण खरचटवणं हा माझा हेतू निश्चितच नाही.
बाकी,
लिहिणाऱ्याने लिहीत जावे,
कोण कसे अंगाला लावून घेत आहे याची चिंता करू नये…
:)

No comments: