नमस्कार मंडळी,
गेले काही काळ मी इथे काही लिखाण करतोय......
माझ्या मनातील विचारतरंग शब्दात पकडायचा हा खेळ....
मी माझ्याशीच चालवलेला....
पण कालांतराने लक्षात आलं की मी इथे एकटाच नाहिये.....
आणखीही कुणीतरी इथे येऊन हे शब्दतरंग वाचून जातंय....
आणि तोडभरून कौतुकही करतंय!!!
मन सुखावलं आणि ओशाळलंही!!
मी आयटीवाला नसल्याने मला हे आंतरजाल आणि संकेतस्थळ चालवण्याबद्दल जेमतेमच माहिती आहे....
त्यामुळे या माझ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करावं, त्यांना धन्यवाद कसे द्यावेत हेच समजत नव्हतं....
म्हणून त्यासाठी ही खास पोस्ट!!!
विजय, विशाल, दिनेश, कोहम्, अंतर्नाद, ट्यूलिप, मऊमाऊ, सतिश, प्रसाद, रोहन आणि मेघा....
माझं लिखाण वाचून त्यावर आवर्जून अभिप्राय दिलात याबद्दल अनेक अनेक धन्यवाद!!!
असाच स्नेह ठेवा...
नंदन आणि भाग्यश्रीची प्रत्यक्ष ओळख असल्याने त्यांचे आभार मानत नाही (कारण घरी येऊन हाणतील ही भीती!!!:))
जमेल तसे अजून पोस्ट टाकायचा विचार आहे...
तुमचे अभिप्राय मोकळेपणाने कळवा...
सस्नेह,
शैलेश